Friday 4 September 2015

बयो. . .

ज्या सुखाला आपण स्वतः पोरके झालेलो असतो तेच सुख मात्र आपल्याकडून इतरांना भरभरुन मिळत असतं.. या गोष्टीत आनंद कितीय माहीत नाही, पण ती अपुर्ण पोकळी भरुन निघाल्याची जाणीव होते. या आपल्यापुरत्या पुर्णत्वाचं समाधान आभाळाएवढं आहे.
शेवटी कसयं चक्र हे पुर्ण होण्यासाठीच असतं मग ते नात्यांचं असो किंवा माणसांचं..!
कुठे ना कुठेतरी त्या अर्ध्यावर सुटलेल्या नात्यांचं बोट धरायला कुणीतरी तयार असतोच.. आपण फक्त तो योग्य हात शोधला पाहिजे..
मनाची समजूत काढण्यात तर अख्खा जन्म जातोच पण तोच जन्म जर कुणासाठी कूणीतरी महत्त्वाचं होऊन जगण्यास मिळत असेल तर ती खरी जन्नत...!

No comments:

Post a Comment