अलवार वाजवित वेणू
तो स्वप्नफुलांवर आला
अन रंग सावळा माझ्या
डोळ्यांवर सोडून गेला. . .
क्षितिजावर निळसर रेघा
गोंदून जराश्या हलक्या
सांजेचे लेऊन पंख
तो कृष्ण किनारी आला. . .
मी तिथेच होते तेंव्हा
थांबले मंदिरापाशी
तो सोनखुणांचे पाऊल
वाळूवर उमटत आला. . .
भरजरी शुभ्र वस्त्रांवर
नाजूक कशिदा त्याच्या
हातात कडे सोन्याचे
मनमोहन लेऊन आला. . .
बैसला जरा बाजूला
मंदिरी पायरीपाशी
डोळ्यात पाहुनी माझ्या
डोळ्यात हरवुनी गेला. . .
हातात घेऊन हात
मज म्हणे, सखे जाऊया. !
मी लाजून हसता गाली
गालांवर उमटत गेला. . .
मज झाली सावळबाधा
मी झाले ना रे राधा. . ?
तो ऋतू जीवघेणा पण,
स्पर्शात शहारून गेला. . .
ती शामनिळाई ल्याली
वेगळीच होती सांज
तो कातरवेळी ऐसा
मोरपीस फिरवून गेला. . .
मी ओढून घ्यावा म्हणुनी
जाताना माझ्यासाठी
कालिंदीच्या काठावर
तो शेला विसरून गेला. . .
तो स्वप्नफुलांवर आला
अन रंग सावळा माझ्या
डोळ्यांवर सोडून गेला. . .
क्षितिजावर निळसर रेघा
गोंदून जराश्या हलक्या
सांजेचे लेऊन पंख
तो कृष्ण किनारी आला. . .
मी तिथेच होते तेंव्हा
थांबले मंदिरापाशी
तो सोनखुणांचे पाऊल
वाळूवर उमटत आला. . .
भरजरी शुभ्र वस्त्रांवर
नाजूक कशिदा त्याच्या
हातात कडे सोन्याचे
मनमोहन लेऊन आला. . .
बैसला जरा बाजूला
मंदिरी पायरीपाशी
डोळ्यात पाहुनी माझ्या
डोळ्यात हरवुनी गेला. . .
हातात घेऊन हात
मज म्हणे, सखे जाऊया. !
मी लाजून हसता गाली
गालांवर उमटत गेला. . .
मज झाली सावळबाधा
मी झाले ना रे राधा. . ?
तो ऋतू जीवघेणा पण,
स्पर्शात शहारून गेला. . .
ती शामनिळाई ल्याली
वेगळीच होती सांज
तो कातरवेळी ऐसा
मोरपीस फिरवून गेला. . .
मी ओढून घ्यावा म्हणुनी
जाताना माझ्यासाठी
कालिंदीच्या काठावर
तो शेला विसरून गेला. . .
छान...सुरेख... अप्रतिम लिखाण . ताई
ReplyDeleteV.nice...
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteसुंदर !
ReplyDeleteतुमची ही सुंदर कविता whats app वर इंदिरा संतांची म्हणून फिरतेय.
ReplyDeleteYes
DeleteBut tase hone ha suddha khup motha gaurav na
Khupch chan..Didi..krushn an Radhech Darshn zalysarkh vatl
ReplyDelete
ReplyDeleteमज झाली सावळबाधा
मी झाले ना रे राधा. . ?
तो ऋतू जीवघेणा पण,
स्पर्शात शहारून गेला. . .
ती शामनिळाई ल्याली
वेगळीच होती सांज
तो कातरवेळी ऐसा
मोरपीस फिरवून गेला. . .
मी ओढून घ्यावा म्हणुनी
जाताना माझ्यासाठी
कालिंदीच्या काठावर
तो शेला विसरून गेला. . .
Tai khup khup Sundar
हि कविता कोणी लिहिली आहे ?
ReplyDeleteमाझ्या माहितीप्रमाणे ही कविता इंदिरा संत यांची आहे.
ReplyDeleteशेला
Deleteनिर्मळ निर्भर वातावरणी
धुके तरंगे धूसर धूसर
झगमगते अन नक्षी त्यावर
सोनेरी किरणांची सुंदर
थंड गुलाबी कार्तिकातला
हवा हवासा स्पर्श तयाचा
सुगंध त्याला नाजूक नाजूक
नव्या उमलत्या बूच फुलांचा
चारुदत्त हा कोण कोठुनी
अंगावरला फेकीत शेला
वसंतसेना वसुंधरेने
झेलून तो हृदयाशी धरला
ही कविता इंदिरा संतांची आहे.
पूजाताई, किती आनंददायी गोष्ट आहे ही की, ही कविता लोक इंदिरा संतांची म्हणून वाचतात. हा गौरव वाटतो मला.. मला वाईट वाटलं नाही उलट कौतूक वाटलं या कवितेसाठी अभिनंदन तुझं ...
ReplyDeleteआगे बढो..